"माणूस"
"माणूस"हा शब्द नुसता उच्चारला तरी आपल्याला जाणीव होते ती प्रेमळ,संवेदनशील,सहिष्णू अंतकरणाच्या,स्वच्छ व निर्मळ मनाच्या,साक्षात परमेश्वराच्या प्रतिकृतीची.किडे-मुंग्या,पशुपक्षी झाडाझुडपांच्या आश्रयी असलेल्या या प्राण्यांपेक्षा दोन हात,दोन पाय,विचार करण्याची क्षमता असलेला प्राणी,ज्याच्या हृदयात प्रेमाचे अखंड झरे वाहतात तो म्हणजे माणूस,निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती म्हणजे माणूस.माणसाच्या बुद्धीची झेप एवढी की तो चंद्रावर पोहोचला,मंगळावरही आपल्या बुद्धीची छाप सोडू पाहत आहे.माणसाने समुद्र काबीज केले,नद्या अडवल्या नि इथेच घोळ झाला.माणसाने लहान मोठी जंगले ताब्यात घेतली तशी माणसाच्या मनातली हिरवळही संपली.पाखरांचे संसार उद्ध्वस्त केले.नि इथेच माणूस विनाशाकडे झुकू लागला.मोठमोठे समुद्र काबीज केले,पण मनात मात्र विचारांचे संकुचित डबके तयार झाले.परंतु हाच माणूस आज एवढा कसा बदलला याचे नवलच नव्हे तर घृणा वाटावी इतकी भयावह अवस्था आज दिसते.माणसं घराने जवळ आली,मात्र मनाने एकमेकांपासून तितकीच दुरावली.शेजाऱ्यांबद्दल प्रेमाऐवजी तिरस्कार वाटू लागला. स्वकियांबद्दलची प्रेमाची संततधार आटून गेली.
जमिनीच्या वादातून सख्या भावानेच भावाला ठार मारले,अभ्यास केला नाही म्हणून आईने आपल्या मुलाच्या तोंडात कांदा घालून हत्या केली,एवढेच नव्हे तर सांगितलेले काम केले नाही म्हणून आताताईपणे आईने सांडशी फेकून मारली नि मुलीचा जीव गेला.बापाने पैसे दिले नाही म्हणून मुलाने बापाच्या डोक्यात काठीचा प्रहार करून त्याला जिवे मारले.अशा घटना वर्तमानपत्रात वाचल्या,समाजात पाहिल्यानंतर हृदयाचा तिळपापड झाल्याशिवाय राहत नाही.
किती शीघ्रकोपीपणा,किती अमानवीपणा म्हणावा हा,की माणुसकीच्या निर्लज्जतेचा कळस म्हणावा.ज्या पित्याला मुलांच्या हृदयात परमेश्वरापेक्षाही उच्च स्थान आहे,त्याच पित्याने स्वतःच्या मुलीवर अत्याचार करावा इथपर्यंत आपली भारतीय संस्कृती ढासळत गेली आहे. झाडाला जशी वाळवी लागते.तशी आज आपल्या संस्कृतीला या अमानुष विचारांची व कृत्त्यांची वाळवी लागली आहे.वेळीच आपण सावरलो नाही,तर एक दिवस नक्कीच वाळवी लागलेल्या झाडाप्रमाणे आपली भारतीय संस्कृती कोलमडून पडणार आहे.काम,क्रोध,पैशाचा हव्यास नि स्वतःच्या मोठेपणाचा डांगोरा पिटणाऱ्या या कलयुगातील माणूस किती स्वार्थांध झाला?याची गोळाबेरीज करणे अवघडच आहे.माणूस म्हणून जगताना माणसाला नक्की काय हवं आहे?मान,सन्मान,पैसा,की स्वतःचे श्रेष्ठत्व यांपैकी काय हवे?याचीच उकल त्याला होत नाही.
कुठं गेली ती माणसं जी इतरांच्या मुलांनाही स्वतःच्या मुलांप्रमाणे जीव लावत असत.संध्याकाळी जेवण करताना वाटीभर भाजी शेजारच्या घरी नेऊन देत असत.आज उरलेली भाजी कचराकुंडीत टाकतील परंतु याची कोणाला तरी गरज आहे,हा विचार त्यांच्या मनाला पुसटसाही शिवणार नाही.कुठे गेली ती माणुसकीची बीजं.आज माणसाचे माणसाशी नाते दुरावले आणि पैशाशी घट्ट झाले आहे.तो पैसा जो ना तुम्हाला प्रेम देईल,ना तुमच्या भावनांना जाणून घेईल,ना दुःखात तुमच्या खांद्यावर आधाराचा हात देईल,त्यालाच आज आपण सर्वस्व मानून बसलो आहोत आणि ज्या माणसाने आपल्यात जगण्याची उमेद निर्माण केली,प्रेमांकुर फुलवला,संकटकाळी खंबीर साथ दिली आज त्याच माणसांना आपण पोरके होत चाललो आहोत.सजीव वस्तूपेक्षा निर्जीव वस्तूच सर्वांना हव्याहव्याशा वाटतात.ही कसली प्रगती,ही तर माणुसकीच्या वाटेवरील अधोगती,जनमानसात आज रुजू पाहत आहे.जीवनात पैशासाठी व आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी प्रत्येक जण आसुसला आहे,मी किती धनवान व लोकप्रिय हे दाखवण्याची जणू भाबडी स्पर्धाच सुरू आहे.
हिंदू-,मुस्लीम,सीख,ईसाई या धर्माच्या पलीकडे माणुसकी हा धर्म सर्वप्रथम पृथ्वीतलावर अस्तित्त्वात आला,हे माणूस विसरूनच गेला आहे.जाती धर्मावरून होत असलेले संघर्ष ही एक माणसाची भळभरती जखम असून ती कुठवर भळभळत राहणार आहे,हा प्रश्न काळजाला सतत कुरतडत राहतो.पावलोपावली आज धर्म-अधर्माचे विखारी वारे वाहताना दिसतात.माणूस म्हणून आपण इतरांच्या भावनांची किती कदर करतो,यावरून माणुसकी जिवंत आहे की मेलेली हे ठरते,नाहीतर आपल्या भावनाही इतर माणसे पायदळीच तुडवणार हे निश्चित आहे,म्हणतात ना,'पेराल तसे उगवते'.माणूस म्हणून जीवनात काय हवे आहे,कोणते कार्य केल्याने माणसाचे जीवन सफल होईल,ह्याच गोष्टीपासून माणूस कोसो दूर आहे.स्वहिताबरोबर समाजहित व देशहित हेही तितकेच महत्त्वाचे आहे,कारण सर्व गोष्टीचा समतोल ठेवण्यासाठी या गोष्टीही तितक्याच लक्षवेधक ठरतात.निसर्गाने मानवाला भरभरून दिले आहे आणि आपण त्याची परतफेड करणे गरजेचे आहे.
माणसे एकत्र कुटुंबात असतील तर त्यांना एकमेकांच्या सुखदुःखाची जाणीव असते.एकमेकांना एकमेकांची साथ मिळते,आधार मिळतो आणि बिकट काळी गडगडलेला मनुष्यही सावरला जातो व आपल्या जीवनाची बिघडलेली घडी नीट बसवतो.माणसांनी घरात सर्वांनी मिळून किमान दिवसातून एकदा तरी एकत्र जेवण करावे,त्यामुळे सुखदुःखाची विभागणी होते.विचारांची देवाण-घेवाण होते.आपलेपणाची भावना वृद्धिंगत होते व वात्सल्य आकार घेऊ लागते.घरी आणलेला पदार्थ सर्वांना देताना दातृत्व हा गुण वाढू लागतो.माणसे एकत्र असताना थोरामोठ्यांची अदब सांभाळून वागतात,त्यामुळे नम्रता,आदरभाव माणसाच्या ठायी वाढू लागतो.
माणसाने माणसाशी माणूस म्हणून सद्वर्तन केले,तर माणसातील माणूस जिवंत आहे याची खात्री पटेल."मनभर आश्वासनापेक्षा कणभर मदत" नक्कीच उपयोगाची,नाहीतर 'मदतीचा हात देऊन माणुसकीची जात' निभावणारा माणूस आज क्वचितच दिसतो.कधीतरी एखाद्या गोरगरीब मुलाच्या हातात पाटी आणि पेन्सिल देऊन पहा तेव्हा कुठे माणूसकी स्वत:हात जिवंत आहे हे अनुभवास येईल.निसर्गातील होत असलेली झाडाझुडपांची कत्तल थांबून स्वतःच्या मुलाप्रमाणे जो त्या झाडांना कवेत घेईल,तेव्हा कुठे माणुसकी जिवंत असल्याचे दर्शन होईल.मुलींच्या जन्माचे स्वागत आनंदाने करा.स्वतःची ओळख सांगताना जो मी प्रथम माणूस व तोही भारतीय आहे हे विसरणार नाही,तेव्हाच आपल्यातला माणूस जिवंत आहे हे निदर्शनास येईल.माणूस म्हणून स्वतःच स्वतःची प्रेरणा वाढवा व इतरांनाही प्रोत्साहित करा.आपल्यासारखा या जगात कोणी नाही याचा अभिमान बाळगा आणि कामाला लागा नक्कीच माणुसकीचा पाठीराखा तुम्ही होऊ शकता,हे विसरू नका.इतरांवर भरोसा करा व स्वत:वरही भरोसा असू द्या.माणूस म्हणून सर्वांना बरोबर घेऊन चला तरच आपणही व इतरही सुख,समाधानाची गोड फळे आनंदाने चाखू.माणसाच्या जीवनाची माणुसकी हीच खरी पुंजी,ती सदैव आपल्या उरी बाळगून असा.माणूस म्हणून जन्माला आलात आणि माणूस म्हणूनच जगाचा अखेरचा निरोप घ्या.👏🏻
लेखक,
श्री.अजिनाथ सासवडे(सर)
मु.पो.लोणी(स.)आष्टी
मो.९४२१३३६०५९
"माणूस"हा शब्द नुसता उच्चारला तरी आपल्याला जाणीव होते ती प्रेमळ,संवेदनशील,सहिष्णू अंतकरणाच्या,स्वच्छ व निर्मळ मनाच्या,साक्षात परमेश्वराच्या प्रतिकृतीची.किडे-मुंग्या,पशुपक्षी झाडाझुडपांच्या आश्रयी असलेल्या या प्राण्यांपेक्षा दोन हात,दोन पाय,विचार करण्याची क्षमता असलेला प्राणी,ज्याच्या हृदयात प्रेमाचे अखंड झरे वाहतात तो म्हणजे माणूस,निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती म्हणजे माणूस.माणसाच्या बुद्धीची झेप एवढी की तो चंद्रावर पोहोचला,मंगळावरही आपल्या बुद्धीची छाप सोडू पाहत आहे.माणसाने समुद्र काबीज केले,नद्या अडवल्या नि इथेच घोळ झाला.माणसाने लहान मोठी जंगले ताब्यात घेतली तशी माणसाच्या मनातली हिरवळही संपली.पाखरांचे संसार उद्ध्वस्त केले.नि इथेच माणूस विनाशाकडे झुकू लागला.मोठमोठे समुद्र काबीज केले,पण मनात मात्र विचारांचे संकुचित डबके तयार झाले.परंतु हाच माणूस आज एवढा कसा बदलला याचे नवलच नव्हे तर घृणा वाटावी इतकी भयावह अवस्था आज दिसते.माणसं घराने जवळ आली,मात्र मनाने एकमेकांपासून तितकीच दुरावली.शेजाऱ्यांबद्दल प्रेमाऐवजी तिरस्कार वाटू लागला. स्वकियांबद्दलची प्रेमाची संततधार आटून गेली.
जमिनीच्या वादातून सख्या भावानेच भावाला ठार मारले,अभ्यास केला नाही म्हणून आईने आपल्या मुलाच्या तोंडात कांदा घालून हत्या केली,एवढेच नव्हे तर सांगितलेले काम केले नाही म्हणून आताताईपणे आईने सांडशी फेकून मारली नि मुलीचा जीव गेला.बापाने पैसे दिले नाही म्हणून मुलाने बापाच्या डोक्यात काठीचा प्रहार करून त्याला जिवे मारले.अशा घटना वर्तमानपत्रात वाचल्या,समाजात पाहिल्यानंतर हृदयाचा तिळपापड झाल्याशिवाय राहत नाही.
किती शीघ्रकोपीपणा,किती अमानवीपणा म्हणावा हा,की माणुसकीच्या निर्लज्जतेचा कळस म्हणावा.ज्या पित्याला मुलांच्या हृदयात परमेश्वरापेक्षाही उच्च स्थान आहे,त्याच पित्याने स्वतःच्या मुलीवर अत्याचार करावा इथपर्यंत आपली भारतीय संस्कृती ढासळत गेली आहे. झाडाला जशी वाळवी लागते.तशी आज आपल्या संस्कृतीला या अमानुष विचारांची व कृत्त्यांची वाळवी लागली आहे.वेळीच आपण सावरलो नाही,तर एक दिवस नक्कीच वाळवी लागलेल्या झाडाप्रमाणे आपली भारतीय संस्कृती कोलमडून पडणार आहे.काम,क्रोध,पैशाचा हव्यास नि स्वतःच्या मोठेपणाचा डांगोरा पिटणाऱ्या या कलयुगातील माणूस किती स्वार्थांध झाला?याची गोळाबेरीज करणे अवघडच आहे.माणूस म्हणून जगताना माणसाला नक्की काय हवं आहे?मान,सन्मान,पैसा,की स्वतःचे श्रेष्ठत्व यांपैकी काय हवे?याचीच उकल त्याला होत नाही.
कुठं गेली ती माणसं जी इतरांच्या मुलांनाही स्वतःच्या मुलांप्रमाणे जीव लावत असत.संध्याकाळी जेवण करताना वाटीभर भाजी शेजारच्या घरी नेऊन देत असत.आज उरलेली भाजी कचराकुंडीत टाकतील परंतु याची कोणाला तरी गरज आहे,हा विचार त्यांच्या मनाला पुसटसाही शिवणार नाही.कुठे गेली ती माणुसकीची बीजं.आज माणसाचे माणसाशी नाते दुरावले आणि पैशाशी घट्ट झाले आहे.तो पैसा जो ना तुम्हाला प्रेम देईल,ना तुमच्या भावनांना जाणून घेईल,ना दुःखात तुमच्या खांद्यावर आधाराचा हात देईल,त्यालाच आज आपण सर्वस्व मानून बसलो आहोत आणि ज्या माणसाने आपल्यात जगण्याची उमेद निर्माण केली,प्रेमांकुर फुलवला,संकटकाळी खंबीर साथ दिली आज त्याच माणसांना आपण पोरके होत चाललो आहोत.सजीव वस्तूपेक्षा निर्जीव वस्तूच सर्वांना हव्याहव्याशा वाटतात.ही कसली प्रगती,ही तर माणुसकीच्या वाटेवरील अधोगती,जनमानसात आज रुजू पाहत आहे.जीवनात पैशासाठी व आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी प्रत्येक जण आसुसला आहे,मी किती धनवान व लोकप्रिय हे दाखवण्याची जणू भाबडी स्पर्धाच सुरू आहे.
हिंदू-,मुस्लीम,सीख,ईसाई या धर्माच्या पलीकडे माणुसकी हा धर्म सर्वप्रथम पृथ्वीतलावर अस्तित्त्वात आला,हे माणूस विसरूनच गेला आहे.जाती धर्मावरून होत असलेले संघर्ष ही एक माणसाची भळभरती जखम असून ती कुठवर भळभळत राहणार आहे,हा प्रश्न काळजाला सतत कुरतडत राहतो.पावलोपावली आज धर्म-अधर्माचे विखारी वारे वाहताना दिसतात.माणूस म्हणून आपण इतरांच्या भावनांची किती कदर करतो,यावरून माणुसकी जिवंत आहे की मेलेली हे ठरते,नाहीतर आपल्या भावनाही इतर माणसे पायदळीच तुडवणार हे निश्चित आहे,म्हणतात ना,'पेराल तसे उगवते'.माणूस म्हणून जीवनात काय हवे आहे,कोणते कार्य केल्याने माणसाचे जीवन सफल होईल,ह्याच गोष्टीपासून माणूस कोसो दूर आहे.स्वहिताबरोबर समाजहित व देशहित हेही तितकेच महत्त्वाचे आहे,कारण सर्व गोष्टीचा समतोल ठेवण्यासाठी या गोष्टीही तितक्याच लक्षवेधक ठरतात.निसर्गाने मानवाला भरभरून दिले आहे आणि आपण त्याची परतफेड करणे गरजेचे आहे.
माणसे एकत्र कुटुंबात असतील तर त्यांना एकमेकांच्या सुखदुःखाची जाणीव असते.एकमेकांना एकमेकांची साथ मिळते,आधार मिळतो आणि बिकट काळी गडगडलेला मनुष्यही सावरला जातो व आपल्या जीवनाची बिघडलेली घडी नीट बसवतो.माणसांनी घरात सर्वांनी मिळून किमान दिवसातून एकदा तरी एकत्र जेवण करावे,त्यामुळे सुखदुःखाची विभागणी होते.विचारांची देवाण-घेवाण होते.आपलेपणाची भावना वृद्धिंगत होते व वात्सल्य आकार घेऊ लागते.घरी आणलेला पदार्थ सर्वांना देताना दातृत्व हा गुण वाढू लागतो.माणसे एकत्र असताना थोरामोठ्यांची अदब सांभाळून वागतात,त्यामुळे नम्रता,आदरभाव माणसाच्या ठायी वाढू लागतो.
माणसाने माणसाशी माणूस म्हणून सद्वर्तन केले,तर माणसातील माणूस जिवंत आहे याची खात्री पटेल."मनभर आश्वासनापेक्षा कणभर मदत" नक्कीच उपयोगाची,नाहीतर 'मदतीचा हात देऊन माणुसकीची जात' निभावणारा माणूस आज क्वचितच दिसतो.कधीतरी एखाद्या गोरगरीब मुलाच्या हातात पाटी आणि पेन्सिल देऊन पहा तेव्हा कुठे माणूसकी स्वत:हात जिवंत आहे हे अनुभवास येईल.निसर्गातील होत असलेली झाडाझुडपांची कत्तल थांबून स्वतःच्या मुलाप्रमाणे जो त्या झाडांना कवेत घेईल,तेव्हा कुठे माणुसकी जिवंत असल्याचे दर्शन होईल.मुलींच्या जन्माचे स्वागत आनंदाने करा.स्वतःची ओळख सांगताना जो मी प्रथम माणूस व तोही भारतीय आहे हे विसरणार नाही,तेव्हाच आपल्यातला माणूस जिवंत आहे हे निदर्शनास येईल.माणूस म्हणून स्वतःच स्वतःची प्रेरणा वाढवा व इतरांनाही प्रोत्साहित करा.आपल्यासारखा या जगात कोणी नाही याचा अभिमान बाळगा आणि कामाला लागा नक्कीच माणुसकीचा पाठीराखा तुम्ही होऊ शकता,हे विसरू नका.इतरांवर भरोसा करा व स्वत:वरही भरोसा असू द्या.माणूस म्हणून सर्वांना बरोबर घेऊन चला तरच आपणही व इतरही सुख,समाधानाची गोड फळे आनंदाने चाखू.माणसाच्या जीवनाची माणुसकी हीच खरी पुंजी,ती सदैव आपल्या उरी बाळगून असा.माणूस म्हणून जन्माला आलात आणि माणूस म्हणूनच जगाचा अखेरचा निरोप घ्या.👏🏻
लेखक,
श्री.अजिनाथ सासवडे(सर)
मु.पो.लोणी(स.)आष्टी
मो.९४२१३३६०५९
अप्रतिम सर
ReplyDeleteNice
ReplyDeleteखूपच छान सर
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteHi sir....तुमचे लेख मी माझ्या आवाजात माझ्या युट्युब चॅनेल वर टाकू शकतो का
ReplyDelete