मराठी "लेख"संग्रह-👈 येथे टच करून हे उघडू शकता.
"शुभमंगल सावधान"
एकनाथने वयाची तीसी पार केली,तरी लगीन नाही अजून पोराचं,या विचारातच रामराव जनावरांना हाकलत जांभळीच्या मळ्याकडे केविलवाण्या चेहऱ्याने झपाझप चालला होता,समोरून पिळदार मिशाचा गणपत सावकार येतोय हे पाहून दचकूनच राम राम सावकार,म्हणत हात हृदयाला भिडवले.सावकाराने आपली गाडी काही अंतरावर झाडाखाली उभी केली व काय रामराव बरं हाय नव्हं? असं विचारताच रामराव आपलं मोठं दुःख ओकू लागला.सावकार लय दिवसापासून मुलाला सोयरीक पाहतोय पण कुठं काय मेळ बसंना,असं कष्टी आवाजात सांगू लागला.शेतकऱ्यांचे दुःख लय मोठे हाय सावकार,कुठबी गेला तरी तो तिरस्काराचा धनीच ठरतो.हूकून चुकून एखादं स्थळ आलं तर ते नोकरीच्या शोधात,आल्या पावली मागं जातया.आता मुलाला एवढं शिकवलं पण नोकरी कुठे लागते आपल्या पोरास्नी.माझं पोर शेती बी अगदी जिवाच्या आकांताने करतया सावकार,पण काय करावं,असं म्हणत रामरावचा कंठ दाटून आला.
रामराव शेजारील गावात एक स्थळ हाय बघ,पण...,पण काय सावकार,बोला,मी माझ्या लेकरासाठी जीव गहाण ठेवायला तयार हाय.तसं नव्हे रे,पण तो मुलीचा बाप खूपच पैशाचा लोभी हाय बघ,म्हणतो कसा,मला दोन लाख रुपये देऊन जो लगीन करून नेईल,त्यालाच पोरगी देईन.असं कुठं असतं का? पण आता काळही तसाच हाय बाबा.तुझा मेळ बसत असेल तर येऊ जाऊन,असं म्हणून गणपत सावकारांनी गाडी चालू केली नि रामरावच्या अंगावर धूर फेकत निघून गेला.रामरावही जड पावलांनी गुरांमागे धावला.
रामरावची बायको यशोदाही मागोमाग जांभळीच्या मळ्यात पोहोचली. दोघेही कामाला लागली.सावकाराने सांगितलेले स्थळ यशोदाच्या कानावर कसे घालावे ह्या विचारानेच तो धास्तावला होता.जडशिळ जिभेने न राहून त्याने यशोदाला सर्व हकीकत सांगितली.दोघेही लग्नाच्या चिंतेत पुरे बुडाले होते. मुलाचे लग्न तर करावेच लागेल, पण कसे करावे;जवळ पैसा नाही आणि पैसा देऊन लग्न करावयाचे म्हटल्यावर कुठून आणावा पैसा, या विचाराने त्यांच्या हृदयात कपार पडल्यासारखं झालं.यशोदाच्या ओठावर आलेले कडवट शब्द तिथल्या तिथेच विरघळून गेले.काय म्हणावे या लोकांना पैसे घेऊन मुलीचे लग्न करतात;म्हणजे हे का बाप म्हणावे;असे रामरावच्या तोंडून आपसूकच शब्द बाहेर पडले.
दिवस मावळतीला गेला होता.रामराव व यशोदा काम आटपून घराकडे निघाली पण मुलगा,लग्न,हाच विचार दोघांच्याही मनात गिरक्या घेत होता.घरी आल्यावर रामराव बाहेरून येतो असे सांगून सावकाराकडे गेला आणि म्हणाला आपण मुलगी पाहून येऊ,पाहू पुढे काय होईल ते. रात्रीला रामरावला सुखाची झोप लागली नाही.सकाळ होताच सावकाराच्या दारात उभा ठाकला.चला सावकार असे म्हणून एकनाथ व त्याच्या मित्राला सोबतीला घेऊन सर्वजण शेजारच्या गावी पोहोचले.मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आटोपला. मुलगी पसंत झाली.त्यांनाही मुलगा आवडला.मुलीच्या बापाने सपसेल पैशाची मागणी केली नि रामरावला बसल्याजागी दरदरून घाम फुटला.सर्व आटोपल्यावर सावकारासह सर्वजण गावी परतले.यशोदाला घायाळ अंतःकरणाने घडला प्रसंग रामरावाने सांगितला,काहीतरी मेळ जमवावा लागेल यशोदा; आणि पोराला उजऊन काढावे लागेल.हे सर्व ऐकून यशोदालाही कापरं भरलं.यशोदेच्या कृष्णाला एवढ्या बायका मिळाल्या अन इथ माझ्या पोराला एक मिळाना,"नाव सोनाबाई अन हाती कथलाचा वाळा"अशी आपली अवस्था झाली या विचाराने तीही खजील झाली.
सावकाराकडून व्याजाने पैसा घ्यावा तर परत कसा करायचा,पाऊस पाण्याचा भरोसा नाही आणि शाश्वत उत्पन्न नाही. रात्रीचे जेवण झाल्यावर सावकारच रामरावच्या घरी लग्नाबद्दल काही मसलत झाली की नाही,हे चाचपून पाहण्यासाठी आले.सावकाराने दारातूनच साद घातली,रामराव हाय का घरात... "या सावकार,बसा."पाणी पिऊन सावकार भिंतीला पाठ देत अंग सैल सोडून बसले.यशोदाबाई मुलगी लई चांदणीसारखी हाय, असं म्हणत सावकारानी विषयाला वाचा फोडली.लटकचं हसून यशोदा म्हणाली,हो सावकार ते सगळं खरे आहे,पण आपण पडलो गरीब माणसं, एवढा मोठा पैसा आणायचा कोठून?व्याजाने घ्यावा तर तो परत करायचा कसा?शेतीच्या उत्पन्नाचा काय भरोसा?असे म्हणत यशोदेने पाटलांना दुजोरा दिला.रामराव बघ तुला चांगली आठ बिघा जमीन हाय,होईल उत्पन्न,हळूहळू करायचे चुकते आणि ते दोन बैल आहेत ना तुझे, ते टाक विकून,चांगला पैसा येईल त्यांचा बाजारात.काय लाल्या-छबिल्या नाय नाय अहो सावकार ते बैलं नाही,ती माझी लेकरं आहेत बघा.घरच्या हरण्या गाईला ती दोन खोंड झाली होती,त्यांना खूप कष्टाने मोठे केले आहे.दुसरं तरी आपल्या जवळ काय आहे धनी,त्यांचे चांगले पैसे येतील टाकू विकून,असं म्हणत यशोदाने आवंढा गिळला.रामरावचे मात्र तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते.काळ किती क्रूर असतो ना;ज्या लाल्या-छबिल्याने आयुष्यभर आपली साथ दिली, शेतात अहोरात्र काम केले,त्यांनाच विकून एकनाथ चा संसार कसा उभा करू?आणि नाही विकू तर काय करू?अशा दुधारी विचाराने त्याचे काळीज करपू लागले."लाल्या छबिल्या" म्हटलं की बैलांनी रामरावकडे प्रेमाने बघावं, त्यांचे पाणीदार डोळे,फुरफुरनारे नाक,उभी डौलदार शिंगे,सर्व एकदम रामरावच्या नजरेसमोर चित्र उभे राहिले."नाही नाही"असे रामराव मनाशीच पुटपुटला.
सावकार केव्हाच निघून गेले होते.रात्रभर यशोदाने धन्याची समजूत घातली.बैलं परत घेऊ पण मुलाला मुलगी परत मिळणे शक्य नाही.कारण अगोदरच आठ-दहा स्थळांनी नकार दिला होता.
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच रामरावने लाल्या-छबिल्याला चारा पाणी भरपूर खाऊ घातले आणि जड अंतःकरणाने बाजारला जाऊन बैल विकून आला.सावकाराकडून काही पैसे,बैलाचे काही आणि इकडून तिकडून दहा-वीस असा मेळ बसवला.पाहुण्यांना सावकाराहाती पैसा व निरोप धाडला.लाल्या-छबिल्या विकल्यापासून रामराव पूरा खचून गेला होता.
शेतकर्यांच्या जीवनाचा खरा सोबती कुणी असेल तर तो म्हणजे त्याची बैलं आणि ते गेल्यावर खानदानी शेतकऱ्याला किती दुःख होते, हे शब्दात सांगता येणार नाही.शेतकऱ्याजवळ बैल नसतील तर त्याचा चौरंग झाल्यासारखे होते.कुणबीक करता येत नाही.ह्या धास्तीनेच रामरावने हाय खाल्ली,नि आपले आता सर्व संपले,असे त्याचे मन त्याला छळू लागले.जणू तो अपमानाच्या अथांग सागरात बुडालाय आणि बुडतचं चाललाय.
एका रात्री जेवण झाल्यावर रामरावने बाहेरून येतो असे सांगून जांभळीच्या मळ्याचा रस्ता धरला.लाल्या-छबिल्याच्या आठवणीच्या विचार सागरात तो पुरता न्हाऊन निघाला होता.ज्या जागेवर जांभळीच्या झाडाखाली रोज तो लाल्या-छबिल्याला बांधायचा तेथे जाऊन विसावला.
सकाळी धनी कुठं दिसना म्हणून यशोदाने एकनाथला रानात गेले की काय पाहून ये,असे सांगितले.पोराचं लगीन ठरलयं अनं धनी काय वेड्यागत हिंडतया असे म्हणत यशोदा कामाला लागली.एकनाथ जांभळीच्या मळ्यात पोहोचला अन पाहतो तर जांभळीच्या झाडाखाली बापाचा निष्प्राण देह पडलेला,तोंडाला फेस आलेला.रामरावने आपली जीवन यात्रा केव्हाच संपवली होती.एकनाथने जीवाच्या आकांताने टाहो फोडला. सर्व गाव जमा झाले.धन्याचा गतप्राण झालेला देह यशोदाने पाहिला आणि जोराचा हंबरडा फोडला;धनी...मात्र आता ही आर्त हाक ऐकू न येण्यासाठी रामरावने आपले कान केव्हाच बंद केले होते.अग्नीडाग देऊन सर्वजण घरी परतले.दहावा तेरावा होऊन सव्वा महिना पालटला,आता नवरा तर गेलाच आहे,पण भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ या विचाराने शेवटचा आधार एकनाथ,त्याचे हात पिवळे करावे आणि कर्तव्यातून मुक्त व्हावे;असे यशोदाने ठरवले.
लग्नाची तयारी जोरात सुरू झाली.लग्नाचा दिवस उजाडला,वऱ्हाडी मंडळी शेजारच्या गावात पोहचली.सूर्य आग ओकू लागला.लग्नघटिका जवळ येऊ लागली.सनई-चौघडे गुमू लागली.तितक्यात मुलीच्या बापाने लग्नखर्चाची यादी पुढे केली.हा पैसा दिल्यावर लग्न लावून देऊ असे लालची बोल बोलू लागला.पैसा गेला व बापही गेला या विचाराने एकनाथ सुन्न झाला.गावातील समजदार मंडळींनी पुढाकार घेतला व वधूपित्याची समजूत घातली.अहो बाप गेलाय मुलाचा,असा अचानक कोठून पैसा आणणार तूम्हाला देण्यासाठी,अगोदरच दोन लाखासाठी जीव खर्ची घातला त्याच्या बापानं,ह्याची थोडी जाण ठेवा आणि भटजी बुवांना द्या परवानगी,होऊ द्या आता,शुभमंगल सावधान.........
लेखक,
श्री.अजिनाथ सासवडे(सर)
मु.पो.लोणी(स.)आष्टी
मो.९४२१३३६०५९
एकनाथने वयाची तीसी पार केली,तरी लगीन नाही अजून पोराचं,या विचारातच रामराव जनावरांना हाकलत जांभळीच्या मळ्याकडे केविलवाण्या चेहऱ्याने झपाझप चालला होता,समोरून पिळदार मिशाचा गणपत सावकार येतोय हे पाहून दचकूनच राम राम सावकार,म्हणत हात हृदयाला भिडवले.सावकाराने आपली गाडी काही अंतरावर झाडाखाली उभी केली व काय रामराव बरं हाय नव्हं? असं विचारताच रामराव आपलं मोठं दुःख ओकू लागला.सावकार लय दिवसापासून मुलाला सोयरीक पाहतोय पण कुठं काय मेळ बसंना,असं कष्टी आवाजात सांगू लागला.शेतकऱ्यांचे दुःख लय मोठे हाय सावकार,कुठबी गेला तरी तो तिरस्काराचा धनीच ठरतो.हूकून चुकून एखादं स्थळ आलं तर ते नोकरीच्या शोधात,आल्या पावली मागं जातया.आता मुलाला एवढं शिकवलं पण नोकरी कुठे लागते आपल्या पोरास्नी.माझं पोर शेती बी अगदी जिवाच्या आकांताने करतया सावकार,पण काय करावं,असं म्हणत रामरावचा कंठ दाटून आला.
रामराव शेजारील गावात एक स्थळ हाय बघ,पण...,पण काय सावकार,बोला,मी माझ्या लेकरासाठी जीव गहाण ठेवायला तयार हाय.तसं नव्हे रे,पण तो मुलीचा बाप खूपच पैशाचा लोभी हाय बघ,म्हणतो कसा,मला दोन लाख रुपये देऊन जो लगीन करून नेईल,त्यालाच पोरगी देईन.असं कुठं असतं का? पण आता काळही तसाच हाय बाबा.तुझा मेळ बसत असेल तर येऊ जाऊन,असं म्हणून गणपत सावकारांनी गाडी चालू केली नि रामरावच्या अंगावर धूर फेकत निघून गेला.रामरावही जड पावलांनी गुरांमागे धावला.
रामरावची बायको यशोदाही मागोमाग जांभळीच्या मळ्यात पोहोचली. दोघेही कामाला लागली.सावकाराने सांगितलेले स्थळ यशोदाच्या कानावर कसे घालावे ह्या विचारानेच तो धास्तावला होता.जडशिळ जिभेने न राहून त्याने यशोदाला सर्व हकीकत सांगितली.दोघेही लग्नाच्या चिंतेत पुरे बुडाले होते. मुलाचे लग्न तर करावेच लागेल, पण कसे करावे;जवळ पैसा नाही आणि पैसा देऊन लग्न करावयाचे म्हटल्यावर कुठून आणावा पैसा, या विचाराने त्यांच्या हृदयात कपार पडल्यासारखं झालं.यशोदाच्या ओठावर आलेले कडवट शब्द तिथल्या तिथेच विरघळून गेले.काय म्हणावे या लोकांना पैसे घेऊन मुलीचे लग्न करतात;म्हणजे हे का बाप म्हणावे;असे रामरावच्या तोंडून आपसूकच शब्द बाहेर पडले.
दिवस मावळतीला गेला होता.रामराव व यशोदा काम आटपून घराकडे निघाली पण मुलगा,लग्न,हाच विचार दोघांच्याही मनात गिरक्या घेत होता.घरी आल्यावर रामराव बाहेरून येतो असे सांगून सावकाराकडे गेला आणि म्हणाला आपण मुलगी पाहून येऊ,पाहू पुढे काय होईल ते. रात्रीला रामरावला सुखाची झोप लागली नाही.सकाळ होताच सावकाराच्या दारात उभा ठाकला.चला सावकार असे म्हणून एकनाथ व त्याच्या मित्राला सोबतीला घेऊन सर्वजण शेजारच्या गावी पोहोचले.मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आटोपला. मुलगी पसंत झाली.त्यांनाही मुलगा आवडला.मुलीच्या बापाने सपसेल पैशाची मागणी केली नि रामरावला बसल्याजागी दरदरून घाम फुटला.सर्व आटोपल्यावर सावकारासह सर्वजण गावी परतले.यशोदाला घायाळ अंतःकरणाने घडला प्रसंग रामरावाने सांगितला,काहीतरी मेळ जमवावा लागेल यशोदा; आणि पोराला उजऊन काढावे लागेल.हे सर्व ऐकून यशोदालाही कापरं भरलं.यशोदेच्या कृष्णाला एवढ्या बायका मिळाल्या अन इथ माझ्या पोराला एक मिळाना,"नाव सोनाबाई अन हाती कथलाचा वाळा"अशी आपली अवस्था झाली या विचाराने तीही खजील झाली.
सावकाराकडून व्याजाने पैसा घ्यावा तर परत कसा करायचा,पाऊस पाण्याचा भरोसा नाही आणि शाश्वत उत्पन्न नाही. रात्रीचे जेवण झाल्यावर सावकारच रामरावच्या घरी लग्नाबद्दल काही मसलत झाली की नाही,हे चाचपून पाहण्यासाठी आले.सावकाराने दारातूनच साद घातली,रामराव हाय का घरात... "या सावकार,बसा."पाणी पिऊन सावकार भिंतीला पाठ देत अंग सैल सोडून बसले.यशोदाबाई मुलगी लई चांदणीसारखी हाय, असं म्हणत सावकारानी विषयाला वाचा फोडली.लटकचं हसून यशोदा म्हणाली,हो सावकार ते सगळं खरे आहे,पण आपण पडलो गरीब माणसं, एवढा मोठा पैसा आणायचा कोठून?व्याजाने घ्यावा तर तो परत करायचा कसा?शेतीच्या उत्पन्नाचा काय भरोसा?असे म्हणत यशोदेने पाटलांना दुजोरा दिला.रामराव बघ तुला चांगली आठ बिघा जमीन हाय,होईल उत्पन्न,हळूहळू करायचे चुकते आणि ते दोन बैल आहेत ना तुझे, ते टाक विकून,चांगला पैसा येईल त्यांचा बाजारात.काय लाल्या-छबिल्या नाय नाय अहो सावकार ते बैलं नाही,ती माझी लेकरं आहेत बघा.घरच्या हरण्या गाईला ती दोन खोंड झाली होती,त्यांना खूप कष्टाने मोठे केले आहे.दुसरं तरी आपल्या जवळ काय आहे धनी,त्यांचे चांगले पैसे येतील टाकू विकून,असं म्हणत यशोदाने आवंढा गिळला.रामरावचे मात्र तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते.काळ किती क्रूर असतो ना;ज्या लाल्या-छबिल्याने आयुष्यभर आपली साथ दिली, शेतात अहोरात्र काम केले,त्यांनाच विकून एकनाथ चा संसार कसा उभा करू?आणि नाही विकू तर काय करू?अशा दुधारी विचाराने त्याचे काळीज करपू लागले."लाल्या छबिल्या" म्हटलं की बैलांनी रामरावकडे प्रेमाने बघावं, त्यांचे पाणीदार डोळे,फुरफुरनारे नाक,उभी डौलदार शिंगे,सर्व एकदम रामरावच्या नजरेसमोर चित्र उभे राहिले."नाही नाही"असे रामराव मनाशीच पुटपुटला.
सावकार केव्हाच निघून गेले होते.रात्रभर यशोदाने धन्याची समजूत घातली.बैलं परत घेऊ पण मुलाला मुलगी परत मिळणे शक्य नाही.कारण अगोदरच आठ-दहा स्थळांनी नकार दिला होता.
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच रामरावने लाल्या-छबिल्याला चारा पाणी भरपूर खाऊ घातले आणि जड अंतःकरणाने बाजारला जाऊन बैल विकून आला.सावकाराकडून काही पैसे,बैलाचे काही आणि इकडून तिकडून दहा-वीस असा मेळ बसवला.पाहुण्यांना सावकाराहाती पैसा व निरोप धाडला.लाल्या-छबिल्या विकल्यापासून रामराव पूरा खचून गेला होता.
शेतकर्यांच्या जीवनाचा खरा सोबती कुणी असेल तर तो म्हणजे त्याची बैलं आणि ते गेल्यावर खानदानी शेतकऱ्याला किती दुःख होते, हे शब्दात सांगता येणार नाही.शेतकऱ्याजवळ बैल नसतील तर त्याचा चौरंग झाल्यासारखे होते.कुणबीक करता येत नाही.ह्या धास्तीनेच रामरावने हाय खाल्ली,नि आपले आता सर्व संपले,असे त्याचे मन त्याला छळू लागले.जणू तो अपमानाच्या अथांग सागरात बुडालाय आणि बुडतचं चाललाय.
एका रात्री जेवण झाल्यावर रामरावने बाहेरून येतो असे सांगून जांभळीच्या मळ्याचा रस्ता धरला.लाल्या-छबिल्याच्या आठवणीच्या विचार सागरात तो पुरता न्हाऊन निघाला होता.ज्या जागेवर जांभळीच्या झाडाखाली रोज तो लाल्या-छबिल्याला बांधायचा तेथे जाऊन विसावला.
सकाळी धनी कुठं दिसना म्हणून यशोदाने एकनाथला रानात गेले की काय पाहून ये,असे सांगितले.पोराचं लगीन ठरलयं अनं धनी काय वेड्यागत हिंडतया असे म्हणत यशोदा कामाला लागली.एकनाथ जांभळीच्या मळ्यात पोहोचला अन पाहतो तर जांभळीच्या झाडाखाली बापाचा निष्प्राण देह पडलेला,तोंडाला फेस आलेला.रामरावने आपली जीवन यात्रा केव्हाच संपवली होती.एकनाथने जीवाच्या आकांताने टाहो फोडला. सर्व गाव जमा झाले.धन्याचा गतप्राण झालेला देह यशोदाने पाहिला आणि जोराचा हंबरडा फोडला;धनी...मात्र आता ही आर्त हाक ऐकू न येण्यासाठी रामरावने आपले कान केव्हाच बंद केले होते.अग्नीडाग देऊन सर्वजण घरी परतले.दहावा तेरावा होऊन सव्वा महिना पालटला,आता नवरा तर गेलाच आहे,पण भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ या विचाराने शेवटचा आधार एकनाथ,त्याचे हात पिवळे करावे आणि कर्तव्यातून मुक्त व्हावे;असे यशोदाने ठरवले.
लग्नाची तयारी जोरात सुरू झाली.लग्नाचा दिवस उजाडला,वऱ्हाडी मंडळी शेजारच्या गावात पोहचली.सूर्य आग ओकू लागला.लग्नघटिका जवळ येऊ लागली.सनई-चौघडे गुमू लागली.तितक्यात मुलीच्या बापाने लग्नखर्चाची यादी पुढे केली.हा पैसा दिल्यावर लग्न लावून देऊ असे लालची बोल बोलू लागला.पैसा गेला व बापही गेला या विचाराने एकनाथ सुन्न झाला.गावातील समजदार मंडळींनी पुढाकार घेतला व वधूपित्याची समजूत घातली.अहो बाप गेलाय मुलाचा,असा अचानक कोठून पैसा आणणार तूम्हाला देण्यासाठी,अगोदरच दोन लाखासाठी जीव खर्ची घातला त्याच्या बापानं,ह्याची थोडी जाण ठेवा आणि भटजी बुवांना द्या परवानगी,होऊ द्या आता,शुभमंगल सावधान.........
लेखक,
श्री.अजिनाथ सासवडे(सर)
मु.पो.लोणी(स.)आष्टी
मो.९४२१३३६०५९